देशातील नागरिकांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर जर विमा धारकाचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला 2 लाखांची विमा राशी दिली जाते.
देशातील बहुतांश नागरिक हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे त्यांना विम्याची प्रिमिअम रक्कम भरून स्वतःचा विमा उतरवणे शक्य नसते व व्यक्तीचा एकाएकी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र सरकार ने Jeevan Jyoti Bima Yojana Marathi ची सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
योजनेचे नाव | Pmjjby Information In Marathi |
लाभार्थी | देशातील सर्व जाती धर्मातील नागरिक |
लाभ | मृत्यूनंतर 2 लाखांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | नागरिकांना विमा संरक्षण देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Pm Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi चे उद्दिष्ट
- देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना कमी प्रिमिअम रकमेमध्ये 2 लाखाचे विमा संरक्षण पुरवणे.
- नागरिकांना जोखीमपासून सुरक्षा देणे.
- कुटुंबातील व्यक्तीचा एकाएकी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये.
- कमी रकमेवर 2 लाखाचे विमा सरंक्षण देणे.
- देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना विमा संरक्षण देणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली एक भरवशाची अशी एक विमा योजना आहे.
- योजनेत विमा खरेदी करणाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता भासत नाही.
- विमा पॉलिसीची मॅच्योरिटी 55 वर्ष निर्धारित केली गेली आहे.
- विम्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी प्रीमियम राशी विमा धारकाच्या बँक खात्यामधून ECS द्वारे परस्पर अदा केली जाते त्यामुळे विमाधारकाला विमा प्रीमियम रक्कम भरण्यासाठी चिंता करण्याची गरज भासत नाही.
- बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे परिचालन केले जाते.
- कोणत्याही क्षणी योजनेतून बाहेर पडलेल्या व्यक्ती भविष्यात या योजनेत 1 जून किंवा त्यानंतर कोणत्याही तारखेला पुन्हा सामील होऊ शकतात.
- योजनेअंतर्गत नावनोंदणी प्रक्रिया जलद आणि सुरळीत ठेवण्यात आलेली आहे.
- पॉलिसी धारकाला मेडिकल तपासणीची गरज नाही.
- योजनेअंतर्गत प्रीमियम दरवर्षी 31 मे रोजी देय असते आणि विमा संरक्षण 1 जूनपासून सुरु होते.
- देशातील सर्व जाती धर्मातील नागरिक
योजनेचा फायदा:
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
- एखाद्या व्यक्ती सोबत आकस्मिक काही घडल्यास त्याच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य सुरक्षित रहाते.
- अत्यंत कमी रकमेत 2 लाखाचे छत्र मिळण्यास मदत होते.
- प्रिमिअम ची रक्कम कमी असल्यामुळे गरीब कुटुंबांना देखील या योजनेमध्ये नोंदणी करणे शक्य होईल.
- आर्थिक अडचणींपासून कुटुंबाचे रक्षण होण्यास मदत होते.
आकारले जाणारे प्रीमियम
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत प्रति सदस्य प्रतिवर्षी 436/- रुपये प्रीमियम राशी आकारण्यात येते.
प्रीमियम | एलआयसी / विमा कंपनीला विमा | व्यावसायिक वार्ताहर, एजंट इत्यादींना कमिशन देय (केवळ नवीन नोंदणीसाठी) | सहभागी बँकेला देय प्रशासकीय खर्च |
पूर्ण वार्षिक प्रीमियम 436/- रुपये | 395/- रुपये | 30/- रुपये | 11/- रुपये |
जोखीम कालावधीच्या दुसऱ्या तिमाहीत जमा 342/- रुपये | 309/- रुपये | 22.50/- रुपये | 10.50/- रुपये |
जोखीम कालावधीच्या तिसऱ्या तिमाहीत जमा 228/- रुपये | 206/- रुपये | 15/- रुपये | 7/- रुपये |
जोखीम कालावधीच्या चौथ्या तिमाहीत जमा 114/- रुपये | 103/- रुपये | 7.50/- रुपये | 3.50/- रुपये |
पात्रता व अटी:
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा धारकाचा मृत्यू झाल्यानंतरच विमा कंपनी विम्याची रक्कम वारसदाराला अदा करते.
- योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे.
- योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
- योजनेच्या रक्कमेवर बँकेद्वारे प्रशासनिक शुल्क आकारले जाते.
- विमाधारक सदस्यांच्या मृत्यू दिनांकापासून 30 दिवसाच्या आत दावा अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
- योजनेच्या रकमेवर जीएसटीही लागू आहे.
- जर एखाद्या विमाधारकाने अनेक बँकांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम भरला असेल व त्याच्या मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला फक्त 2 लाखाची रक्कम दिली जाईल.
- बँक खात्यातून विम्याची प्रीमियम रक्कम कट झालेल्या दिवसापासून प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ सुरु होईल.
- एखादी व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फक्त एकाच विमा कंपनीकडून किंवा फक्त एकाच बँकेतून घेऊ शकते.
- योजनेअंतर्गत विमाधारकाचे वय 55 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विम्याचे कवर समाप्त होते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- अपघातामुळे झालेला मृत्यू वगळता पॉलिसी सुरू झाल्यापासून / पॉलिसीमध्ये परत आल्यापासून 45 दिवसांच्या मृत्यू झाल्यास (एकदा पॉलिसीमधून बाहेर पडल्यानंतर नव्याने नावनोंदणी झाल्यास किंवा पॉलिसी नूतनीकरणाला उशीरा झाल्यास) दावा देय असणार नाही.
- योजनेअंतर्गत विमा कव्हर 1 जून ते 31 मे पर्यंतच्या एका वर्षाच्या कालावधीसाठी असेल.
- प्रथमच नाव नोंदणी करणाऱ्या सदस्यांसाठी योजनेत नावनोंदणी झाल्यापासून पहिल्या 30 दिवसांत (धरणाधिकार कालावधी) मृत्यू झाल्यास (अपघाताशिवाय) विमा संरक्षण उपलब्ध होणार नाही. धरणाधिकार कालावधी दरम्यान मृत्यू (अपघातांव्यतिरिक्त) कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.
टोल फ्री नंबर:
आवश्यक कागदपत्रे:
नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- पॅन कार्ड
योजनेअंतर्गत दावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (वारसाचे)
- पॅन कार्ड (वारसाचे)
- रहिवाशी दाखला (वारसाचे)
- ई-मेल आयडी (वारसाचे)
- मोबाईल नंबर (वारसाचे)
- बँक खात्याचा तपशील (वारसाचे)
- पासपोर्ट आकाराचे फोटो (वारसाचे)
- विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र
मृत्यूच्या पुराव्याच्या समर्थनार्थ दस्तऐवज खालीलपैकी कोणतेही असू शकते
- मृत्यू प्रमाणपत्र (स्थानिक भागासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेले जन्म आणि मृत्यू निबंधकावारे जारी केलेले)
- रुग्णालयातील डिस्चार्ज सारांश / प्रमाणपत्र यामध्ये मृत व्यक्तीच्या संदर्भात, त्याचे / तिचे नाव, वडिलांचे / पतीचे नाव, पत्ता आणि मृत्यूची तारीख, वेळ आणि कारण निर्दिष्ट केलेले असावे.
- मृत व्यक्तीच्या संदर्भात शेवटच्या उपस्थितीत नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशनरने (इंडियन मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीकृत डॉक्टर) जारी केलेले प्रमाणपत्र, त्याचे/तिचे नाव, वडिलांचे / पतीचे नाव, पत्ता आणि मृत्यूची तारीख, वेळ आणि कारण नमूद करणे आवश्यक आहे केंद्र किंवा राज्य सरकारच्या राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे किंवा मृत खातेधारकाच्या बँकेच्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेच्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही विमा कंपनीने त्याची कागदपत्रे अधिकृत असल्या बाबत त्याच्या प्रतिस्वाक्षरीखाली शिक्का मारलेला असावा..
- जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी / संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त किवा संबंधित कार्यकारी दंडाधिकारी (अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार / तालुक्दार इ.) यांनी अधिकृत केलेल्या अधिकार्याने मृत व्यक्तीच्या संदर्भात प्रमाणपत्र दिलेले असावे आणि ते योजना दावा हक्क सेटलमेंट प्रक्रियेच्या विहित नमुन्यातील असावे.
योजनेअंतर्गत अपघाताने झालेल्या मृत्यूचे समर्थनार्थ असलेले दस्तऐवज खालीलपैकी कोणत्याही प्रकाराचे असू शकतात
- मृत्यू पुराव्यासाठी वर सूचीबद्ध केलेल्या पैकी कोणताही एक दस्तऐवज’ आणि त्यासोबत (अ) एफआयआर पंचनामा किंवा (ब) शव परिक्षण अहवाल
- जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी / संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त किंवा कोणत्याही अधिकृत कार्यकारी दंडाधिका- यांनी (अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, उप-विभागीय दंडाधिकारी, तहसीलदार / तालुकदार, इ.) यांनी अधिकृत केलेल्या अधिकार्याने मृत व्यक्तीच्या संदर्भात योजना दावाहक्क समझोता / सेटलमेंट प्रक्रियेच्या विहित नमुन्यात दिलेले प्रमाणपत्र.
- साप चावणे, झाडावरून पडणे, इत्यादी कारणामुळे अपघाती मृत्यू झालेला असल्यास मृत्यूच्या अहवालांमध्ये आणि रुग्णालयाच्या नोंदीमध्ये मृत सदस्याचे नाव, त्याच्या वडिलांचे / तिच्या पतीचे नाव, पत्ता, मृत्यू दिनांक, वेळ आणि मृत्यूचे कारण याचा उल्लेख असावा.
- नामनिर्देशित व्यक्ती / नियुक्त / दावेदार याचे ओळखीचे समर्थनार्थ त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक फोटो ओळखपत्र [EPIC] किंवा मनरेगा कार्ड किंवा ड्रायव्हिंग परवाना किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक असू शकते.
नोंदणी करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपले बचत खाते असलेल्या बँकेत जावे लागेल.
- बँकेत जाऊन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यकता कागदपत्रे जोडून अर्ज बँकेत जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून 436/- रुपये वजा केले जातील व तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र ठराल.
दावा अर्ज करण्याची पद्धत:
- ज्या व्यक्तीच्या नावे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेतली आहे त्याचा एखाद्या कारणाने मृत्यू झाल्यावर त्यांच्या वारसाला संबंधित बँकेत जावे लागेल.
- बँकेमधून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा दावा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज जमा करावा लागेल.
- बँक कर्मचाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाईल.
Telegram Group | Join |
PMJJBY Toll Free Number | 1800-180-1111 / 1800-110-001 |
PMJJBY Portal | Click Here |
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Form In Marathi PDF | Click Here |
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Claim Form In Marathi | Click Here |
PMJJBY Declaration Form | Click Here |
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत महत्वाच्या गोष्टी:
- या योजनेचा कालावधी 1 वर्षाचा आहे.
- विमा कवर 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.
- जर तुम्ही 31 मे पर्यंत विम्याचा हफ्ता भरला नाही तर तुमचा विमा कवर समाप्त होईल.
- तुम्ही या योजनेमधून कधी पण बाहेर पडू शकता.
- जर तुम्ही या योजनेमधून बाहेर पडलात तर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम परत केली जाणार नाही.
- तुम्ही योजनेमधून बाहेर पडल्यावर पुन्हा कधी पण योजनेमध्ये प्रवेश करू शकता.